Nana Fadanis
Marathi
रूढ अर्थाने हे नाना फडणिसांचे चरित्र नाही. पानिपतच्या धामधुमीतून केवळ दैवयोगाने देशी सुखरूप परत आलेल्या नाना फडणिसांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि कार्यकुशलतेने मराठी राज्याची घडी कशी बसविली? विशेषत: थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर अराजक सदृश्य परिस्थितीत, फुटीर सरंजामी सरदारांना लगामी राखून त्यांना पेशव्यांचे सार्वभौमत्व कसे मान्य करावयास लावले? देशी-विदेशी शत्रुंच्या महत्त्वाकांक्षेला कसा लगाम घातला? बारभाई प्रयोग राबविताना नाना कुठे कमी पडले? सातारकर छत्रपती, पेशवे यांच्याशी त्यांचा राजकीय व्यवहार कसा राहिला, या सार्यांचे अस्सल - प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांच्या आधारे केलेले ‘नाना फडणीस’ या पुस्तकातील विवेचन बोधप्रद वाटेल, असा विश्वास वाटतो.
✻